पंढरपूर : विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला ऊस दिलेल्या शेतकऱ्यांची देणी मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला असून साखर विक्री करून शेतकऱ्यांची रक्कम देण्याचे आदेश सहकार विभागाने दिले आहेत.
पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना आर्थिक अडचणीत सापडला असून यावर्षी गळीत हंगाम देखील सुरु झाला.नाही. सभासद आणि ऊस उत्पादक यांनी कारखान्यास गाळपासाठी ऊस दिला पण त्याची बिले मिळाली नाहीत. थकित एफआरपी मिळावी म्हणून शेतकऱ्यांनी कारखान्याचे उंबरठे झिजवले, संघर्ष केला पण थकित रक्कम मिळाली नाही. कारखान्याकडून उसाची बिले मिळण्यावर शेतकऱ्यांचे आर्थिक गणित अवलंबून असते आणि त्यावर बाजारपेठ देखील गजबजत असते. ही बिले न मिळाल्याने शेतकरी तर अडचणीत आलाच पण व्यापारी वर्गाची उधारी न मिळाल्याने त्यांना देखील या संकटाचा सामना करावा लागत आहे. सदर रक्कम शेतकऱ्यांना मिळावी यासाठी कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके हे सतत प्रयत्न करीत राहिले पण आता मात्र थकित रक्कम मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
न्यायालयापर्यंत धाव !
आता मार्ग मोकळा
हे देखील वाचा >>>
- पंढरीत मुलाचा खून करून महिलेची आत्महत्या !
- महिलेच्या डोक्यावरून गेले मालट्रकचे चाक !
- कारखाना निवडणूक : मतदार यादीत नाव नसेल तर एम डी जबाबदार !
- नियम रद्द ! जमीन खरेदी विक्री आता झाली सोपी !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !