BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

६ मे, २०२२

जमिनीची तुकड्यात देखील करता येणार खरेदी विक्री !




औरंगाबाद : तुकडेबंदीचा नियम न्यायालयाने रद्द केला असून आता तुकड्यात देखील जमिनीची खरेदी विक्री करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे जमिनीचे तुकडे करून विकण्याची अथवा खरेदी करण्याची सोय झाली आहे. 


जमिनीचे तुकडे करून त्याची विक्री अथवा खरेदी करणे कायद्याने अडचणीचे केले होते त्यामुळे इच्छा असली तरी अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी तुकड्यात विकता येत नव्हत्या आणि खरेदी करणाऱ्या छोट्या शेतकऱ्यास तुकड्यात जमिनी खरेदी करता येत नव्हत्या पण आता ही अडचण दूर झालेली आहे. राज्यातील तुकडेबंदीचा नियम आणि त्यासंबंधीचे परिपत्रक मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने रद्द ठरवले आहे त्यामुळे अशा प्रकारे जमिनी खरेदी आणि विक्री करण्याचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला आहे. तीन गुंठे नसले तरी तुकड्यात जमिनीची खरेदी करणे त्यामुळे आता शक्य होणार आहे. अशा जमिनीच्या खरेदी आणि विक्रीच्या नोंदणीचे व्यवहार होण्याचा मार्ग खुला झाला आहे.

 

महाराष्ट्र शासनाच्या राज्य मुद्रांक विभागाने १२ जुलै २०२१ पासून जमीन तुकडेबंदी नियम लागू केला होता. या नियमांमुळे तुकड्यात जमीन घेणे अथवा विक्री करणे अडचणीचे झाले होते. बिगरशेती ४४ जमीन वगळता इतर सर्व घरे आणि प्लॉट यांची नोंदणी देखील या नियमांमुळे बंद झाली होती.  ज्यांना तुकड्यात जमीन घेणेच शक्य होते अशा सर्वांची आणि तुकड्यात जमीन विकणाऱ्याची देखील मोठी कोंडी झाली होती. एक अथवा दोन गुंठे जमीन व्यवहार करता येत नव्हते त्यामुळे अनेकांचा नाईलाज झाला होता आणि त्यांनी जमीन घेणे रद्द केले होते अशांची आता चांगली सोय झाली आहे. 


जमिनीचे तुकडे करून विकता येत नव्हते आणि त्याची नोंदणी बंद करणायत आली होती. केवळ महाराष्ट्र नोंदणी नियम ४४ (१) (ई) एवढाच नियम ठेवण्यात आला होता. अशा घर आणि जमिनीची खरेदी विक्री व्यवहार केवळ बॉंडपेपरवर व्हायला लागले होते. या सगळ्या प्रकाराच्या विरोधात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती त्यावर न्यायालयाने निर्णय दिला असून तुकडा बंदी चा नियम न्यायालयाने रद्द केला आहे. (Buying and selling land will be easy) यामुळे आता तुकडा बंदीमुळे होणारा त्रास संपुष्टात येणार आहे आणि एक दोन गुंठे जमिनीचा व्यवहार देखील करता येणार आहे. 


असा होता नियम 

एक एकर जमिनीचा पट्टा असेल तर त्याचे तुकडे करून त्यापैकी एक अथवा दोन गुंठे जमीन विकायची असल्यास ती विकता येत नव्हती आणि त्याची नोंदणी देखील होत नव्हती. जमिनीचे ले औट केले तरच नोंदणीची मुभा देण्यात आलेली होती किंवा जिल्हाधिकारी यांच्या परवानगीनेच नोंदणी होत होती


चांगल्या हेतूने कायदा 

जमिनीच्या तुकड्यामुळे शेती व्यवसाय तोट्यात येवून शेती विकासाला खिल बसत आहे, शेती विकासाला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने तसेच शेतीचे उत्पन्नात सुधारणा करून उत्पादकता वाढविणे या उद्देशाने तुकडेबंदी कायदा अमलात आणला होता आणि त्यावेळी त्याचे स्वागत झाले होते.


परिस्थिती बदलली 

तुकडेबंदीचा नियम केला तेंव्हाची परिस्थिती आता राहिली नाही, मुलांना शिक्षण देण्यासाठी बँकेकडून कर्ज मिळण्यात अडचण येते, तारण द्यायचे ते पुरेसे नसते शिवाय ज्यांच्याकडे दोन तीन गुंठे जमीन आहे तिची विक्री करण्यात देखील कायद्याची अडचण येत होती पण आता हा नियम बदल झाल्याने देखील स्वागत करण्यात येत आहे 


हे देखील वाचा >>>

 




  



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !