सोलापूर : वाढत्या तापमानामुळे आजपासून सोलापूर जिल्ह्यातील प्रथाकिम शाळांच्या वेळा पुन्हा बदलल्या असून आता या शाळा सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंतच भरणार आहेत.
कोरोनामुळे दोन वर्षांपासून शाळांचे दरवाजे बंद राहिले आणि यामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शाळेत जाण्याच्या वयात मुले घरात कोंडलेल्या अवस्थेत दोन वर्ष राहिली. ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय स्विकारण्यात आला होता परंतु अनेक विद्यार्थ्यांकडे स्मार्ट फोन नव्हता त्यामुळे ते या शिक्षणापासूनही वंचित राहिले आहेत. विद्यार्थ्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी उन्हाळ्यात देखील शाळा सुरु ठेवण्याबाबत निर्णय झाला पण यावर्षी उन्हाळा अधिकच कडक असल्याने हा पर्याय देखील अडचणीचा ठरू लागला. वाढते तापमान आणि उष्णतेची लाट यामुळे राज्यात उष्माघाताचे काही बळी गेले आहेत त्यामुळे एप्रिल महिन्यातील शाळेला विरोध होत राहिला आहे.
हे देखील वाचा : (बातमीवर क्लिक करा )
- सोलापूर महावितरण अधिकारी सापडला रंगेहात !
- चिमुटभर तंबाखुसाठी साखर कारखाना कामगाराचा खून !
- खोटे बोल पण रेटून बोल !
- पंढरपूर- मिरज मार्गावरील अपघातात पोलीस ठार !
- शेतकऱ्याचं पोरगं डॉक्टर होणार, गावाला कौतुक !
अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !