BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२९ जाने, २०२४

वाळू चोरायला गेले आणि भलतेच अंगावर 'शेकले' ! पाच जणांविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा !

 




शोध  न्यूज : चोरीच्या मार्गाने वाळूचा उपसा करायला केले पण अनपेक्षित प्रकरण अंगावर शेकले असल्याची घटना पंढरपूर तालुक्यात घडली असून, पाच जणांच्या विरोधात मनुष्य वधाचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे. त्यामुळे ही वाळू चोरी वेगळ्या वळणावर जाऊन पोहोचली आहे.

पंढरपूर तालुक्यातील चिंचोली भोसे येथे एक धक्कादायक घटना घडली होती. रामा अनिल धोत्रे (वय १९, रा. अनिलनगर, पंढरपूर), विकी मारुती जाधव (वय २०, रा. अनिलनगर, पंढरपूर), राज विलास मोहिते (वय १९, रा. अनिलनगर, पंढरपूर), आकाश ऊर्फ चम्या शिंदे (रा. कैकाडी मठामागे, पंढरपूर) हे शनिवारी वाळू काढण्यासाठी नदीच्या पात्रात गेले होते. यावेळी एक अत्यंत धक्कादायक घटना घडून गेली. नदीच्या बाजूला वाळू काढण्यासाठी पोखारण्यात आले होते आणि त्या खालील वाळू काढण्यासाठी रामा अनिल धोत्रे हा आत गेला होता. यावेळीच वाळूचा वरचा थर अचानक खाली कोसळला आणि तो थेट रामा धोत्रे याच्या अंगावर पडला. आत असलेला रामा त्याच वाळूखाली दाबला गेला आणि त्याच्या अंगावर मोठ्या प्रमाणत वाळू पडल्याने त्याला बाहेर निघता आले नाही. 


धोत्रे वाळूखाली दाबला गेल्याचे पाहून  त्याचे काही साथीदार घाबरून पळून गेले तर तेथे थांबलेल्या साथीदारास काहीच करता आले नाही. त्याच्या अंगावर पडलेली वाळू बाजूला करण्यासाठी त्याच्याजवळ काहीच साहित्य नव्हते. डोळ्यादेखत रामा हा वाळूखाली अडकला असल्याचे दिसत असतानाही त्याला काही करता येत नव्हते. असे सांगण्यात आले होते, अखेर रामा हा त्याच वाळूखाली गुदमरून गेला आणि तेथेच त्याचा मृत्यू देखील झाला. या घटनेने मोठी खळबळ उडवून तर दिलीच पण पंढरपूर तालुक्यात याची मोठी चर्चाही सुरु आहे. आता या प्रकरणी पंढरपूर पोलिसांनी मोठी कारवाई केल्याने हे प्रकरण वेगळ्या वळणावर पोहोचले असल्याचे आणि ते पाच जणांच्यावर भलतेच शेकले गेले असल्याचे समोर आले आहे. शिवाय मयत झालेल्या रामा धोत्रे याला बळजबरीने वाळू काढण्यासाठी नेल्याची मोठी बाब देखील समोर आली  आहे. 

राम अनिल धोत्रे या १९ वर्षे वयाच्या तरुणाचा वाळूत गुदमरून मृत्यू झाल्यानंतर पोलिसात फिर्याद देण्यात आली आहे. मृत्यू होऊ शकतो हे माहित असतानाही रामा धोत्रे याला वाळू  उपसण्यासाठी नेल्याने त्याचा मृत्यू झाला असल्याची फिर्याद पोलिसात दाखल  झाली आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी पाच जणांच्या विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल  केला आहे. आकाश बबन शिंदे (रा. आढीव विसावा, पंढरपूर), राज विलास मोहिते (रा. अनिलनगर, पंढरपूर), विकी उर्फ विकास मारुती जाधव (रा. अनिलनगर, पंढरपूर), बबलू वैरागकर, राजू नेमाडे (रा. पंढरपूर) यांच्या विरोधात ही मोठी कारवाई झाली आहे. यामुळे अन्य वाळू चोरांना देखील  धडकी भरली आहे.


नको म्हणत असतानाही रामा अनिल धोत्रे याला वाळू उकराण्याचे काम करण्यासाठी नेण्यात आले, अशा प्रकरणी मृत्यू होऊ शकतो हे माहित असताना देखील त्याला वाळू उकरण्याचे काम करायला लावले आणि वाळू उकरण्याचे काम करीत असताना वाळू त्याच्या अंगावर पडून, पाण्यात बुडून त्याचा  मृत्यू झाला. शिवाय त्यानंतर त्याला तेथेच सोडून सगळेजण पळून गेले त्यामुळे त्याच्या मृत्यूला हे सगळेच कारणीभूत आहेत अशा आशयाची फिर्याद मयत राम अनिल धोत्रे याची आई रुक्मिणी धोत्रे यांनी दिली. (A case has been registered against five sand thieves) या तक्रारीवरून पोलिसांनी सदर पाच जणांच्या विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे हे प्रकरण त्यांच्यावर चांगलेच शेकले असून,अन्य वाळू चोरांना देखील  धडकी भरली आहे. 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !