सोलापूर : भरणेमामा, आपण निष्ठुर आहात, उजनीचे पाणी पळवाल तर सोलापुरात पाऊल ठेवू देणार नाही असा इशारा आता भारतीय जनता पक्षाचे नेते, माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिला आहे.
उजनीच्या पाण्याबाबत पालकमंत्री दत्तात्रय भरणे पुन्हा एकदा वादात सापडले असून लाभक्षेत्रातील शेतकरी आक्रमक झाले असतानाच काल काँग्रेस पक्षाच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी अत्यंत कडक शब्दात इशारा दिला होता. सत्तेशी आपल्याला देणेघेणे नाही, उजनीचे पाणी पळवाल तर खबरदार ! असा इशारा राष्ट्रवादीचे पालकमंत्री दत्तामामा भरणे यांना दिला होता. काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष सत्तेत असताना उजनीच्या पाण्यावर या दोन्ही पक्षात संघर्ष सुरु झाला आहे. त्यातच आता भारतीय जनता पक्षाने देखील उडी घेतली आहे. उजनी धरणातील दोन टीएमसी पाणी इंदापूर तालुक्यातील लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजनेसाठी मंजूर करण्यात आल्यामुळे संघर्षाचा भडका होऊ लागला आहे.
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे इंदापूर मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. इंदापूर तालुक्याला उजनीचे पाणी नेण्याचा विषय यापूर्वी देखील पेटला होता आणि लाभक्षेत्रातील शेतकरी आक्रमक झाल्यानंतर शासनाला देखील निर्णय फिरवावा लागला होता. राष्ट्रवादीचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे पालकमंत्रीपद राष्ट्रवादीने काढावे अशी मागणी देखील होत होती. त्यानंतर आता पुन्हा इंदापूरला उजनीचे पाणी नेण्याचा विषय ऐरणीवर आला आणि शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. (Ujjain water dispute, Subhash Deshmukh is aggressive) राजकीय वातावरण देखील आता तापू लागले असून काल आ. प्रणिती शिंदे तर आज माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी तोफ डागली आहे.
हे देखील वाचा : >>
- विधवेच्या गळ्यात मंगळसूत्र, कपाळावर कुंकू !
- पडक्या घरात सोन्याचा हंडा !
- उजनीचे पाणी पळवाल तर खबरदार ! आम्ही मेलो काय ?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !