BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२ मे, २०२२

लग्नाची झाली तयारी, ऐनवेळी पळाली नवरी !



पुणे : लग्नाची सगळी तयारी झाली पण ऐनवेळी नवरी पळून गेली आणि नवरदेवाला मात्र नवरीची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात जाण्याची वेळ आल्याची धक्कादायक घटना लोहगाव येथे घडली आहे.


अलीकडे बनावट नवरीचे प्रस्थ वाढले असून लग्नाळू तरुणाची मोठी फसवणूक होत असते. लग्न करून ही बनावट नवरी दागिने घेवून पसार झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. याशिवाय ठरलेली लग्न देखील ऐनवेळी देण्याघेण्यावरून अथवा अन्य मानपानावरून मोडलेली दिसतात.  महत्प्रयासाने लग्न जुळतात पण ती उधळून जाताना फारसे मोठे कारणही लागत नाही. अत्यंत किरकोळ कारणावरून अखेरच्या क्षणी लग्न मोडली जातात पण पुण्याच्या लोहगाव येथे मात्र ऐनवेळी नवरीच पळून गेली आणि नवरोबाला हात चोळत पोलीस ठाण्याच्या दारात जाऊन बसावे लागले आहे. त्यामुळे लग्न ठरले तरी अक्षता पडेपर्यंत ते होईलच अशी खात्री अलीकडे काही देता येत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 


दोन महिन्यांपुर्वी एक तरुण  आणि तरुणी यांच्या कुटुंबात बोलणी होऊन लग्न जमविण्यात आले. लग्न निश्चित झाल्यानंतर दोन्हीकडील पाहुण्यांनी एकत्र येऊन लग्नाची सुपारी फोडण्याचा कार्यक्रम मोठ्या आनंदात आणि उत्साहात झाला. लग्नाची तारीख निश्चित करण्यात आली, त्यानुसार बसता बांधण्यात आला आणि लग्नाच्या निमंत्रणपत्रिका छापून त्या पै पाहुणे आणि मित्रमंडळीना वाटण्यात आल्या. एकुणात सगळे काही उत्साहात आणि आनंदात सुरु होते. लग्नाची सगळी तयारी पूर्ण झाली होती (At the last moment, the bride ran away) पण अखेरच्या क्षणी नवरी मुलगीच पळून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आणि दोन्ही कुटुंबात गोधळ उडाला. 


वरपित्याने पळून गेलेली मुलगी आणि तिच्या आईवडील, भाऊ यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि रीतसर तक्रार दिली आहे. सुपारी फोडण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर लग्नाच्या तयारीसाठी वर पित्याने १ लाख ७५ हजार रुपयांचा खर्च केला होता. विवाह जमविणे, विधी करणे, लग्नपत्रिका छापणे, जेवण आदीसाठी वर पित्याने खर्च केला होता पण हा सर्व खर्च वाया गेला आणि लग्न न होऊ शकल्यामुळे मनस्ताप मात्र त्यांच्या वाट्याला आला. 


न सांगता नवरी पळाली !

लग्नाच्या ऐनवेळी नवरी पळून गेल्याने गोंधळ उडणे स्वाभाविक आहे पण ही नवरी कधी आणि कुठे पळाली याची माहिती कुणालाच नाही. नवरी कुणाबरोबर तरी पळून गेली एवढा अंदाज लावण्यात आला. तिच्या पळण्यामुळे तिचे कुटुंब मात्र मोठ्या अडचणीत सापडले आहे. 


बदनामी झाली !

नवरी मुलगी अखेरच्या क्षणी कुणाबरोबर तरी पळून गेल्याने समाजांत आणि पाहुण्यात आपली बदनामी झाली आहे. लग्नाचा खर्च करण्यास सांगून वधूपित्याने आपली फसवणूक केली असल्याची तक्रार मुलाच्या वडिलाने केली आहे. न झालेल्या या लग्नाची चर्चा मात्र जोरदारपणे सुरु झाली आहे.


हे देखील वाचा : >>

        


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !