'ओमीक्रॉन' चा धोका !
कोरोना परतीच्या मार्गाला लागला असे वाटत असतानाच 'ओमीक्रॉन' ने चिंता वाढवली आहे आणि पुन्हा तिसऱ्या लाटेची चर्चा सुरु झाली आहे. राज्यात रोज नव्या ठिकाणी 'ओमीक्रॉन'चे रुग्ण आढळून येऊ लागले आहेत. यासंदर्भात भाष्य करताना आरोग्यमंत्र्यांनी सावधगिरीचे आवाहन केले आहे. 'राज्यात 'ओमीक्रॉन'चे रुग्ण वाढत असतील तर याचा परिणाम फेब्रुवारी महिन्यात पाहायला मिळू शकतो असा अंदाज टास्क फोर्सने व्यक्त केला आहे' अशी माहिती टोपे यांनी दिली आहे. बुलढाणा, उस्मानाबाद येथेही 'ओमीक्रॉन'चे रुग्ण आढळून आले आहेत. राज्यातील 'ओमीक्रॉन' रुग्णांची संख्या २८ वर पोहोचली आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची गरज असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
निर्बंध नाहीत !
'ओमीक्रॉन' मुळे शासन आणि प्रशासन अधिक सतर्क झाले असल्याने पुन्हा निर्बंध लादले जातात की काय अशी भीती नागरिकांना वाटत आहे पण लगेच कुठले निर्बंध लावले जाणार नाहीत असे टोपे यांनी स्पष्ट केले आहे. नूतन वर्ष, ख्रिसमस, ३१ डिसेंबरच्या पार्ट्या यावर कोणतेही निर्बंध लावण्यात येणार नाहीत परंतु लसीकरणही वाढवावे लागेल आणि नागरिकांनी कोरोना प्रतिबंधाचे नियम पाळावेत आणि गर्दीही टाळावी असे आवाहन टोपे यांनी केले आहे.
---------------
हे देखील वाचा >>>>
पहिल्यांदाच ...! सख्खे भाऊ आणि चौघेही आमदार !
भाजप नेता दोन कोटींचा मालक 'मजूर' !
पहिल्यांदाच ...! सख्खे भाऊ आणि चौघेही आमदार !
-------------------
चाचण्यांचे दर कमी !
खाजगी प्रयोगशाळेचे आरटीपीसीआर चाचण्यांचे दर कमी करण्यात आले आहेत. रेल्वे स्टेशन, विमानतळ अशा ठिकाणी अतिशीघ्र चाचणीसाठी आधी ४ हजार ५०० रुपये दर आकाराला जात होता तो आता १ हजार ९७५ एवढा करण्यात आला आहे, ठरमोफिशरचा दर देखील १ हजार ९७५ एवढाच ठेवण्यात आला असून टाटाचा दर ९७९ रुपये करण्यात आला आहे. पीपीई कीट उपलब्ध झाल्यास भविष्यात हे दर आणखी कमी करण्यात येतील असेही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !