BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

३१ मे, २०२२

नवऱ्यावर राग, आईनेच घेतला सहा मुलांचा जीव !

 


महाड : नवऱ्याचा राग आला आणि जन्मदात्या मातेनेच आपल्या सहा मुलावर राग काढत त्यांना थेट विहिरीत फेकून त्यांचा जीव घेतल्याची धक्कादायक, क्रूर आणि तितकीच वेदनादायक घटना घडली आहे. 


आईंच्या ममतेपुढे या जगात काही नाही, आईसारखं श्रेष्ठ प्रेम दुसरं कुठंच मिळत नाही असा अनुभव संपूर्ण विश्वाला आहे. संसाराचे चटके सोसून आई मात्र आपल्या लेकराला मायेच्या पदराखाली ठेवून त्याला कसलीही धग लागू देत नाही, स्वत: उपाशी राहून लेकरांचे पोट भरणारी आई आपल्याच मुलांच्या जीवावर उठेल ही कल्पना देखील न पटणारी आहे परंतु अनेकदा अशा काही माता समोर येतात आणि आईच्या मातृत्वाला देखील धक्का लागतो. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला असून या घटनेने काळीज गोठून टाकले आहे. (The mother threw the six children into the well) नवऱ्यावर असलेल्या रागापोटी या मातेने आपल्याच सहा मुलांना एकावेळी विहिरीत फेकून दिले आणि त्यांचा जीव घेतला आहे. 


रुना सहानी नावाच्या मातेने माणुसकीला काळीमा लावणारा आणि मातेच्या ममतेवरील विश्वासाला छेद देणारी अमानवी घटना घडवली आहे. पती पत्नीच्या दरम्यान विविध कारणावरून वाद होत असतात आणि ते विसरून संसाराचा गाडा पुढे जात असतो. रुना सहानी आणि तिचा पती चिखरू सहानी यांच्यात काही कारणामुळे घरगुती वाद झाला होता. या भांडणाचा रुना सहानीला मोठा राग आला होता. याच रागाच्या भरात तिने आपल्या दीड वर्षांपासून दहा वर्षे वयाच्या मुलांपर्यंत सर्व सहा मुलांना चक्क दोनशे फुट खोल असलेल्या विहिरीत फेकून दिले. शेतातील ही विहीर असल्यामुळे या घटनेची माहितीही कुणाला मिळाली नाही आणि विहिरीत सर्व मुलांचा मृत्यू देखील झाला आहे. 


पोलीस ठाण्यात हजर 
दुपारी मुलांना विहिरीत फेकून दिल्यानंतर सहा तासांनी रुना सहानी पोलीस ठाण्यात हजर झाली आणि तिने आपल्या या अमानवी गुन्ह्याची पोलिसात कबुली दिली. ही घटना ऐकून पोलीस देखील हादरले. पोलिसांनी तातडीने त्या विहिरीकडे धाव घेतली. गावकरी देखील मोठ्या संख्येने गोळा झाले पण मध्ये भरपूर वेळ गेला होता आणि सर्वच्या सर्व सहा मुले मृत्युमुखी पडली होती.


आईच्या रागाचे बळी !
दीड वर्षे वयाची मुलगी राधा, तीन वर्षाचा शिवराज, पाच वर्षांची विद्या, सहा वर्षे वयाची रेश्मा, आठ वर्षांची करिष्मा आणि दहा वर्षांची रोशनी ही सहा मुलं आई वडिलांच्या भांडणाची आणि क्रूर आईच्या रागाची बळी ठरली आहेत.  विहिरीत शिडी लाऊन या मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. 


परिसर हादरला !
सदर घटना प्रकाशात आली तेंव्हा महाड तालुकाच नव्हे तर संपूर्ण रायगड जिल्हा हादरून गेला. पतीवरील रागामुळे आई आपल्याच सहा मुलांचा एकावेळी जीव घेऊ शकते ही कल्पनाच कुणाला पटत नव्हती. पोलिसांनी रुना सहानी आणि तिचा पती याला ताब्यात घेतले आहे परंतु ही घटना ऐकून देखील अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला आहे.    


हे देखील वाचा :>>>>



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !