मुंबई : कोरोना पुन्हा वाढू लागला असून सावधगिरी बाळगा आणि मास्कचा (Corona Mask) वापर करा असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले आहे.
दोन अडीच वर्षे कोरोनाने जगणे आणि मरणे देखील कठीण केले होते. तिसरी लाट पहिल्या दोन्ही लाटांच्या तुलनेत तितकीशी प्रभावी ठरली नाही परंतु काही प्रमाण का होईना पण तिसऱ्या लाटेने देखील नुकसान केले आहे. तिसरी लाट संपण्याआधीच चौथी लाट येण्याची चर्चा सुरु झाली होती. काही दिवस गेल्याने चौथी लाट आता येणार नाही असे वाटत असतानाच पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. जून महिन्यात कोरोनाची चौथी लाट असेल असे आधीपासूनच अभ्यासकांनी सांगितलेले आहे त्यामुळे वाढत्या कोरोना रुग्णांची अधिक चिंता निर्माण होऊ लागली आहे. कोरोनाची तिसरी लाट ओसरत गेल्याने राज्य सरकारने निर्बंध हटवले आहेत पण तरीही गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर अवश्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असून केंद्र शासनाने आधीच राज्यांना सूचना केलेल्या आहेत. कोरोनाला अटकाव करणारी पंचसूत्री पाळण्याचे आवाहं केले आहे यात मास्क, सामाजिक अंतर, लसीकरण यांचाही समावेश आहे परंतु राज्य शासनाने राज्यातील परिस्थिती लक्षात घेत मास्कची सक्ती केली नाही. आज मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रुग्ण वाढत असल्याचे सांगत कोरोनाबाबत खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. (Increase in corona patients, Chief Minister's appeal) मुंबईसह राज्यातील कोरोनाचा संसर्ग कमी होताना दिसत होता परंतु आता मुंबईमध्ये दर दिवशी सरासरी दोनशे रुग्ण आढळून येवू लागल्याने शासन आणि आरोग्य विभाग अधिक सर्तक झाला आहे.
चौथ्या लाटेचा धोका कायम
देशातील कोरोनाची तिसरी लाट जवळपास संपली आहे परंतु कोरोनाच्या चौथ्या लाटेचा धोका अजूनही कायम आहे. कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता आरोग्य तज्ञांनी व्यक्त केली आहे. कोरोना संसर्गाचा राज्यातील सद्याचा साप्ताहिक दर १.५९ एवढा असून मुंबई तसेच पुणे या शहरात राज्याच्या सरासरीपेक्षा अधिक रुग्ण आढळून येऊ लागले आहेत.
रुग्णांची वाढती संख्या
तिसरी लाट ओसरताना कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने घटली होती पण आता मागच्या काही दिवसांपासून मुंबईत रुग्णांच्या संख्येत ५२.७९ टक्के वाढ झाली आहे. ठाण्यात २७.९२ तर रायगड आणि पालघर जिल्ह्यात देखील वाढ आढळून आली आहे.
मास्क आवश्यक !
कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असली तरी रूग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी आहे परंतु कोरोना पूर्णपणे गेलेला नाही त्यामुळे प्रत्येकाने दक्षता बाळगावी आणि मास्कचा वापर करावा, लसीकरण करून घ्यावे. कोरोना चाचण्यांचे प्रमाण कमी झाले आहे ते वाढविण्यात यावे असे आदेश देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.
हे देखील वाचा :>>>>
खालील बातमीला टच करा !
अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !