नीरा उजवा आणि डाव्या कालव्यातून ३० जूनपर्यंत शेतीसाठी दोन आवर्तने देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. (Water for summer farming from Nira canal) बारामती, इंदापूर, फलटण, खंडाळा, पंढरपूर, माळशिरस या परिसरातील शेतकरी बांधवांची ऐन उन्हाळ्यातील पाण्याची गरज यामुळे पूर्ण होणार आहे.
नीरा कालव्यातुनही पाणी !
मागील वर्षी चांगला पाउस झाल्याने पुणे जिल्ह्यातील नीरा देवधर, भाटघर, वीर, गुंजवणी या धरणात मिळून ३५. ५३ टीएमसी पाणी साठा आहे. या उन्हाळ्यात पाण्याची टंचाई जाणवणार नाही हे आधीपासूनच स्पष्ट आहे. नीरा उजवा आणि डाव्या कालव्यातून सद्या पाणी सोडलेले आहेच पण याला जोडूनच आणखी एक आवर्तन देण्याचा महत्वपूर्ण निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत झाला आहे. ३० जून पर्यंत शेतीसाठी सलग दोन आवर्तने दिली जाणार असल्याने उन्हाळ्यात शेतकरी बांधवास मोठा दिलासा लाभला आहे.
तर जूननंतरही पाणी !
कालवा सल्लागार समितीची बैठक ( Canal Advisory Committee) झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा आदेश दिला आहे. सदर बैठकीस सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि बांधकाम विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार गिरीश बापट, आमदार राम सातपुते, समाधान आवताडे, अशोक पवार, भीमराव तापकीर, चेतन तुपे, सुनील शेळके, पुणे पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता संजीव चोपडे यांच्यासह पुणे महापालिका आयुक्त आणि जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. नीरा उजवा कालव्यातून पंढरपूर, माळशिरस तालुक्याच्या लाभक्षेत्रासाठी मंजूर कोट्याप्रमाणे पाणी दिले जाणार असून यावेळी पावसास विलंब झाला तर ३० जूनच्या नंतरही पिण्यासाठी पाणी ( Will release water for drinking) सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
हे देखील वाचा :
- उजनी धरणातून कालव्यात सोडणार पाणी !
- शेतीसाठी जूनपर्यंत मिळणार दोन आवर्तने !
- विठ्ठलभक्त माजी मुख्यमंत्र्यांना सक्तमजुरीची शिक्षा !
- अजितदादा पवार म्हणाले, 'नाही तर ते काय घंटा देणार '?
- इशारा ! पुढील पाच दिवसात उष्णतेची लाट !
अधिक बातम्यासाठी येथे क्लिक करा !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !