BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२७ मार्च, २०२२

उजनी धरणातून शेतीसाठी सोडणार पाणी !

 



सोलापूर : लाभक्षेत्रातील शेतीसाठी उजनी धरणातून येत्या ५ एप्रिल रोजी कालव्यातून पाणी सोडले जाणार असून सहा टीएमसी पाणी सोडण्याचे नियोजन (Ujani Dam) करण्यात आले आहे. 


उन्हाळ्याची तीव्रता वाढत असून शेतीसाठी पाण्याचीही मागणी वाढू लागली आहे. जलसंपदा विभागाकडून पाणी  मागणी  अर्ज भरून देण्याचे आवाहन यापूर्वीच करण्यात आले असून वेळोवेळी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पाणी  अर्जाचे आवाहन करण्यात येत असते. पावसाळ्यात राज्यभर चांगला पाऊस झालेला असून सर्वत्र चांगला पाणीसाठा आहे. उन्हाळा सुरु होऊन मार्च महिना संपत आला तरी धरणात मुबलक पाणी साठा असल्यामुळे यावर्षी पाण्याची टंचाई जाणवणार नसून शेतीलाही पुरेसे पाणी  मिळणार आहे. शेतकऱ्यांची देखील पाण्याची मागणी होत असून त्यानुसार येत्या ५ एप्रिल रोजी उजनीच्या डाव्या आणि  उजव्या कालव्यातून उन्हाळी आवर्तन सोडण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. 


५ एप्रिल पासून उजनी धरणातून शेतीसाठी कालव्याद्वारे पाणी सोडण्यात येणार असून ५ मे पर्यंत म्हणजे संपूर्ण महिनाभर पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरु राहणार आहे. या काळात सहा टीएमसी पाणी कालव्यातून सोडले जाणार आहे. उजनी धरणाच्या क्षेत्रात चांगला पाउस झाल्याने यावर्षी उजनी धरण १२० टक्के एवढे भरले गेले होते. मार्च संपत आला तरी उजनी धरणाची पाणी पातळी चांगली असून शेतीसाठी मागच्याच महिन्यात उजनी धरणातून पाणी सोडण्यात आले होते. आता उन्हाळी आवर्तन ५ एप्रिल रोजी सुरु केले जाणार आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी उजनी धरणात समाधानकारक पाणी साठा आहे.  (Water will be released from Ujani dam for agriculture) कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत उजनी धरणातून उन्हाळी आवर्तन देण्याचा निर्णय झाला आहे त्यानुसार हे पाणी सोडण्यात येणार आहे.

नीरा उजवा आणि डाव्या कालव्यातून ३० जूनपर्यंत शेतीसाठी दोन आवर्तने देण्याचा निर्णय  या बैठकीत घेण्यात आला आहे. (Water for summer farming from Nira canal) बारामती, इंदापूर, फलटण, खंडाळा, पंढरपूर, माळशिरस या परिसरातील शेतकरी बांधवांची ऐन उन्हाळ्यातील पाण्याची गरज यामुळे पूर्ण होणार आहे. 


नीरा कालव्यातुनही पाणी !

मागील वर्षी चांगला पाउस झाल्याने पुणे जिल्ह्यातील नीरा देवधर, भाटघर, वीर, गुंजवणी या धरणात मिळून ३५. ५३ टीएमसी पाणी साठा आहे. या उन्हाळ्यात पाण्याची टंचाई जाणवणार नाही हे आधीपासूनच स्पष्ट आहे. नीरा उजवा आणि डाव्या कालव्यातून सद्या पाणी सोडलेले आहेच पण याला जोडूनच आणखी एक आवर्तन देण्याचा महत्वपूर्ण निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत झाला आहे.  ३० जून पर्यंत शेतीसाठी सलग दोन आवर्तने दिली जाणार असल्याने उन्हाळ्यात शेतकरी बांधवास मोठा दिलासा लाभला आहे. 


तर जूननंतरही पाणी !

कालवा सल्लागार समितीची बैठक ( Canal Advisory Committee) झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा आदेश दिला आहे. सदर बैठकीस सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि बांधकाम विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार गिरीश बापट, आमदार राम सातपुते, समाधान आवताडे, अशोक पवार, भीमराव तापकीर, चेतन तुपे, सुनील शेळके, पुणे पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता संजीव चोपडे यांच्यासह पुणे महापालिका आयुक्त आणि जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.  नीरा उजवा कालव्यातून पंढरपूर, माळशिरस तालुक्याच्या लाभक्षेत्रासाठी मंजूर कोट्याप्रमाणे पाणी दिले जाणार असून यावेळी पावसास विलंब झाला तर ३० जूनच्या नंतरही पिण्यासाठी पाणी ( Will release water for drinking) सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 


हे देखील वाचा :


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !