BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१६ जाने, २०२२

सोन्यासाठी तीन वृद्ध महिलांना मारून जाळले !

 




रत्नागिरी : व्यवहारी जगात माणुसकीचा रोज खून होताना दिसत असतानाच ही माणुसकी आगीत जळून नष्ट झाल्याची अत्यंत विदारक घटना घडली असून सोन्याच्या दागीन्यासाठी तीन वृद्ध महिलांना मारून  जाळून टाकल्याचा अंगावर काटा आणणारा प्रकार समोर आला आहे.


पैशासाठी माणूस काहींही करतो आणि कुठल्याही पातळीला जातो याची असंख्य उदाहरणे आपल्या अवती भवती घडून गेलेली असतात पण रत्नागिरीच्या दापोली तालुक्यात घडलेली घटना महाभयंकर आणि अंगावर काटा आणणारी ठरली आहे. दापोली तालुक्यातील वानोशी खोतवाडी येहे एकाच घरातील तीन वृद्ध महिलांची निर्दयपणे हत्या करण्यात आल्याची घटना आधी उघडकीस आली होती. क्रूरतेच्या सगळ्या मर्यादा ओलांडून राक्षसी वृत्तीने या तीन वृद्ध महिन्ची हत्या केली आणि नंतर हे मृतदेह जाळून देखील टाकले होते. दापोली पालगड रस्त्यावर असलेल्या खोतवाडी या गावात जेमतेम पंचवीस घरे आहेत. त्यातील बरीचशी घरे बंदच असून ते कामासाठी मुंबईला स्थलांतरित झालेली आहेत. त्यामुळे अवघ्या चार ते पाच कुटुंबाचेच गाव उरलेले आहे.त्यातील एका घरातील तीन वृद्ध महिलांना अमानुषपणे मारून टाकण्यात आले. 


पार्वती पाटणे, (९०), रुक्मिणी पाटणे (८०) आणि सत्यवती पाटणे (८०) या महिलांची करण्यात आलेली हत्या ही अज्ञात मारेकऱ्यांनी केली आणि त्यांचे मृतदेह पेटवून दिले. त्यांच्या अंगावर असलेले १ लाख ६२ हजार रुपये किमतीचे दागिनेही चोरून नेण्यात आले. एवढी मोठी घटना घडली पण कुणाला याची खबर लागली नाही. घरातून कुणीच बाहेर येत नाही म्हणून शेजारी इंदुमती पाटणे यांनी आपल्या कुटुंबासह घराची पाहणी केली असता तीनही वृद्ध महिलांचे मृतदेह वेगवेगळ्या खोलीत पडलेले त्यांना दिसले. या तिन्ही मृतदेहावर  ऍसिड सारखा पदार्थ आढळून आला. या घटनेने रत्नागिरी जिल्हा हादरून गेला असून पोलिसही चक्रावून गेले आहेत. अत्यंत वेगाने पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. पण मानवतेला लाजवेल अशीच राक्षसी घटना अज्ञात व्यक्तींनी घडवली असल्याने अनेकांना हादरा बसला आहे.   


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !