BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२५ जाने, २०२३

सामुहिक आत्महत्या नसून सात जणांचे खून ! पोलीस तपासात धक्कादायक सत्य उघड !

 


शोध न्यूज : भीमा नदीच्या पात्रातील सात जणांचा मृत्यू हे खून असून चुलत भावानेच हे हत्याकांड घडवून आणले असल्याचे उघडकीस आले आहे त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.


एकाच कुटुंबातील सात जणांचे मृतदेह भीमा नदीच्या पात्रात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती आणि ही सामुहिक आत्महत्या असल्याचे समोर आल्याने महाराष्ट्र हादरून गेला होता. आत्महत्येचे सांगितले गेलेले कारण हे न पटण्यासारखे होते आणि  अखेर पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावण्यात यश मिळवले असून ही घटना सामुहिक आत्महत्या नसून नात्यातील व्यक्तीनेच सात जणांचे केलेले हे खून असल्याची अत्यंत धक्कादायक माहिती उजेडात आली आहे त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या काळजाचा ठोका चुकला आहे. पन्नास वर्षीय आजोबापासून नातवापर्यंत सात जणांचे मृतदेह आढळून आले होते यात पती पत्नी, मुलगी जावई आणि तीन लहान मुलांचा समावेश आहे.  मुलाने मुलगी पळवून नेल्याने आणि त्याने वडिलांचे न ऐकल्यामुळे सर्वांनी आत्महत्या केल्याचे सांगितले गेले होते परंतु धक्कादायक सत्य समोर आले आहे. 


कौटुंबिक वादातून चुलत भावाने या सात जणांची हत्या केल्याचा अत्यंत धककादायक प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला आहे. मोहन पवार आणि त्यांचे कुटुंबीय हे १७ जानेवारी रोजी भीमा नदीजवळ आले तेंव्हा त्यांना चुलत भावाने अडवले आणि त्यांना बेशुद्ध करून त्यांच्यासह त्यांच्यासोबत असलेल्या तीन मुलानाही भीमा नदीत फेकून देण्यात आले. बेशुद्धावस्थेतच त्यांचा भीमा नदीच्या पाण्यात मृत्यू झाला असल्याची बाब उघडकीस आली आहे. मयत मोहन पवार हे मुळचे बीड जिल्हयातील गेवराई परिसरातील रहिवासी असून एक वर्षापूर्वी कुटुंबासह दौंड परिसरातील पारगाव येथे राहण्यास आले होते. शेतमजुरी, माती खोदकाम, उसतोडणी अशी कामे ते करत होते. तर, त्यांचे जावई शामराव फुलवरे हे आपल्या कुटुंबासह उस्मानाबाद, वाशी येथे राहत होते. त्यांचा अत्यंत धक्कादायक पद्धतीने भीमा नदीच्या पात्रात शेवट झाला.


मोहन पवार यांच्या चुलत भावाने हे हत्याकांड घडवले असून पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी चार जणांना अटक केली असून एक जण मात्र फरार झाला आहे. कौटुंबिक वादातून ही घटना घडली असल्याची बाब पोलिसांच्या तपासात निदर्शनास आली आहे. सहा महिन्यांपुर्वी चुलत भावांपैकी एकाचा मुलाचा अपघातात मृत्यू झाला होता परंतु हा मृत्यू अपघाती नसून मोहन पवार यांनी खून केल्याचा संशय सदर चार आरोपींना होता आणि त्यातूनच हे हत्याकांड घडले आहे असे पोलीस तपासात उघड झाले आहे.  आरोपी हे मयत  मोहन पवार यांचे सख्खे चुलत भाऊ असून याप्रकरणी पोलिसांनी अशोक कल्याण पवार (वय ४०), श्याम कल्याण पवार (वय ३० ),प्रकाश कल्याण पवार (वय ३२) आणि आणखी एक त्यांचा भाऊ अशा चौघांना अटक केली आहे. 

मोहन उत्तम पवार (वय ५० वर्षे) संगीता मोहन पवार (वय ४५ वर्षे, दोघे रा.खामगांव ता. गेवराई), त्यांचे जावई शामराव पंडित फुलवरे (वय ३२ वर्षे), त्यांची पत्नी राणी शामराव फुलवरे (वय २७ वर्षे), शामराव फुलवरे यांचा मुलगा रितेश शामराव फुलवरे (वय ७ वर्षे), छोटू शामराव फुलवरे (वय ५ वर्षे) आणि कृष्णा (वय ३ वर्षे) अशी मृतांची नावे आहेत. (Seven murders were revealed in the Bhima river basin) सुरुवातीला सामुहिक आत्महत्या वाटणारे हे प्रकरण धक्कादायक वळणावर पोहोचले असून भयानक हत्याकांड असल्याचे समोर आल्याने राज्यभर खळबळ उडाली आहे. 





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !