मोहोळ : अवकाळी पावसाचा मोठा फटका बसत असतानाचा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात वीज कोसळून तीन गायींचा मृत्यू झाला आहे.
राज्यात विविध जिल्ह्यात अवकाळी पावसाचा धिंगाणा सुरु असतानाच विजांचा कडकडाट होत आहे. अवकाळी पावसाच्या काळात वीज कोसळण्याच्या घटना देखील वाढत असताना सोलापूर जिल्ह्यात देखील आज वीज पडण्याची घटना घडली आहे. वादळी वारे आणि अवकाळी पाऊस यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असतानाच आज वीज कोसळून तीन गायींचा मृत्यू होण्याची दुर्दैवी घटना घडली आहे.आज रविवारी पहाटेपासून जिल्ह्याच्या विविध भागात पावसाने हजेरी लावली, काही भागात मध्यरात्रीच पावसाचे आगमन झाले होते. यावेळी पावसापेक्षा ढगांचा गडगडाट अधिक प्रमाणात होता आणि विजांचे तांडव देखील सुरु होते. या दरम्यान मोहोळ तालुक्यतील येणकी येथे वीज कोसळली आहे.
मोहोळ तालुक्यातील येणकी येथील धनाजी नागनाथ कदम यांच्या गायींच्या अंगावर वीज कोसळल्यामुळे तीन गायींचा जागीच मृत्यू झाला आहे. मोहोळ तालुक्यात यापूर्वीही वीज कोसळण्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. अवकाळी पाऊस आणि वादळी वारे यामुळे आंब्याचे देखील मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे यावर्षी आंबा उत्पादनात थोडी घट होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान रात्रीपासून पावसाळी वातावरण निर्माण झाल्याने आणि काही प्रमाणात पावसाचे आगमन झाल्याने हवेत गारवा निर्माण झाला असून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !