मुंबई : राज्यातील तापमान वाढले असतानाच संपूर्ण एप्रिल महिन्यासाठी हवामान विभागाने कडक इशारा दिला असून एप्रिलमध्ये उन्हाळा प्रचंड कडक असणार आहे त्यामुळे विशेष काळजी घेण्याची गरज आहे.
अवकाळी पावसाने राज्याला तडाखा दिल्यानंतर आता राज्यात उष्णतेची लाट आली असून दोन शेतकऱ्यांचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अशा घटनामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले असतानाच हवामान विभागाच्या नव्या अंदाजाने चिंता वाढवली आहे. उद्यापासून एप्रिल महिना सुरु होत आहे आणि कडक उन्हाळ्याचा मे महिना अजून यायचा आहे. तोच उन्हाची तीव्रता वाढत निघाली असून उन्हाचे जोरदार चटके बसू लागले आहेत. सद्याच्याच उन्हामुळे नागरिक हैराण झालेले असताना एप्रिल महिना अत्यंत कडक उन्हाळ्याचा असणार आहे असा इशाराच हवामान विभागाने ( Summer Forecast in Maharashtra) दिला आहे.
एप्रिल महिन्यात राज्यातील किमान आणि कमाल तापमान हे सरासरीपेक्षा अधिक राहील. उन्हाळा अधिक तीव्र होणार असून कोकण, मध्य महाराष्ट्रात पाउसही सरासरीपेक्षा अधिक होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. एप्रिल महिन्यात तापमान वाढलेले दिसणार असून ते सरासरीपेक्षा अधिक असणार आहे. उत्तर महाराष्ट्र, कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यातही सरासरीपेक्षा जास्त तापमानाची नोंद होण्याची शक्यता असल्याचेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे पुढील दोन महिने हे त्रासाचे आणि उन्हाच्या तीव्रतेचे जाणार असल्याचे दिसत आहे.
पावसाचाही अंदाज
उन्हाळा कडक असण्याचे संकेत स्पष्ट झाले आहेत तसे यंदा येणारा पावसाळा देखील चांगला असणार असल्याचे अंदाज व्यक्त होऊ लागले आहेत. ऑस्ट्रेलियन हवामान विभागाने याआधीच पावसाचा अंदाज व्यक्त केला असून देशात तसे महाराष्ट्रात मुबलक पाउस होणार असल्याचे सांगितले आहे. आता भारतीय हवामान विभागाने देखील तसाच अंदाज व्यक्त केला असून एप्रिल महिन्यात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज दिला आहे.
तापामान वाढणार
सद्या उष्णतेची लाट असल्यामुळे राज्यातील तापमान वाढलेले असून आणखी दोन तीन दिवस ही लाट कायम राहील असे सांगितले जात असतानाच आता एप्रिल महिना कडक उन्हाळ्याचा असणार आहे त्यामुळे यंदाचा उन्हाळा संपेपर्यंत तापमानात सतत वाढच होत जाणार आहे असे संकेत स्पष्ट झाले आहेत. उष्णतेची लाट सुरु होताच राज्यात दोन शेतकऱ्यांचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे त्यामुळे चिंता वाढताना दिसत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !