शोध न्यूज >: सोलापूर जिल्ह्यात अत्यंत उत्साहात आणि चुरशीने ग्रामपंचायत निवडणुकीचे मतदान पार पडले असून सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक मतदानाची नोंद पंढरपूर तालुक्यात झाली आहे. उद्या मंगळवारी मतमोजणी होत आहे.
सोलापूर जिल्ह्यातील १७७ ग्रामपंचायतींचे सरपंच आणि सदस्यत्व पदांसाठी रविवारी मतदान घेण्यात आले. ३ लाख ८३ हजार १३ मतदारांनी बजावला मतदानाचा अधिकार बजावला असून जिल्ह्यातील एकूण मतदान ८१.१९ टक्के इतके झाले असून सर्वात अधिक मतदान पंढरपूर तालुक्यात (८७.०३ टक्के) झाले. ग्राम पंचायत निवडणुकीत ३ लाख ७९ हजार ७३२ मतदारांपैकी ३ लाख ८३ हजार १३ मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला. दरम्यान, सर्वच आघाड्यांनी विजयाचा दावा केला असला तरी विजयी गुलाल कोण उधळणार ? हे मात्र मंगळवारी स्पष्ट होणार आहे. मतदान व मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू केला आहे.मतमोजणीनंतर विजयी मिरवणूक काढण्यास व जल्लोष करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
जिल्ह्यातील एकूण ६६८ केंद्रांवर मतदान केंद्रावर मतदान झाले. जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतींपैकी १५ सरपंच व ३२९ सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. उर्वरित १७७ ग्रामपंचायती व १ हजार ४१७ सदस्यांसाठी ६६७ मतदान केंद्रांवर रविवार, १८ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० यावेळेत मतदान झाले. ग्रामपंचायती निवडणूकीसाठी करमाळा-८३, माढा - ३२, बार्शी- ५७, उत्तर सोलापूर - ५७, मोहोळ - ३०, पंढरपूर- ३५, माळशिरस- १५९, सांगोला - २१, मंगळवेढा-४९, दक्षिण सोलापूर - ७१, अक्कलकोट-७३ याप्रमाणे एकूण ६६८ मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली होती.
सोलापूर जिल्ह्यात तालुकानिहाय झालेल्या मतदानाची टक्केवारी, एकूण मतदार कंसात झालेले मतदान करमाळा-८२.४६ % एकूण मतदान - ३८७०७ (३१९१६) माढा-८१.४१ % एकूण मतदान -१९१८२ (१५६१७) बार्शी-८३.२८ % एकूण मतदान २२७९१ (१८९८१) उत्तर सोलापूर-७९.४८ % एकूण मतदान ३०८६६ (२४५३२) माहोळ-८४.१७% एकूण मतदान १६५१६ (१३९०१) पंढरपूर-८७.०३% एकूण मतदान १९४१२ (१६८९४) माळशरस-८०.०२% एकूण मतदान १०७६७२ (८६१५८) सांगोला-८२.६३% एकूण मतदान १४२०५ (११७३७) मंगळवेढा-८४.३८ % एकूण मतदान २९९३९ (२५२६४) दक्षिण सोलापूर-७८.२८% एकूण मतदान ४७०२५ (३६८१३) अक्कलकोट-७९.३०% एकूण मतदान ३३४१७ (२६५००) एकण-८१.१९ % एकूण मतदार ३७९७३२ (३०८३१३)
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रत्येक मतदान केंद्रावर एक अधिकारी, केंद्राध्यक्ष, एक मतदार यादी तपासणी कर्मचारी, निरीक्षक, एक शिपाई अशा पाच कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. जिल्हास्तरावरुन महसूल उपजिल्हाधिकारी विठ्ठल उदमले यांनी तर तालुकास्तरावर संबंधित तालुक्याचे तहसीलदार यांनी मतदान प्रक्रियेचा आढावा घेतला. ७ पोलीस उपअधीक्षक, १३ पोलीस निरीक्षक, ५४ सहायक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक, ६४५ पोलीस अंमलदार, एक हजार होमगार्ड, १०० जणांची एक राज्य राखीव पोलीस बलाची तुकडी, दंगा नियंत्रण पथक व जलद प्रतिसाद पथकाची प्रत्येकी एक तुकडी असा तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक हिंमतराव जाधव हे परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. जिल्ह्यात सर्वत्र मतदान शांततेत आणि तितक्याच चुरशीने पार पडले.
अनेक मतदान केंद्रावर सकाळपासून मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. दुपारच्या दरम्यान काहीशी कमी झालेली गर्दी मतदानाच्या अखेरच्या टप्प्यात मात्र भलतीच वाढली. दुपारी चार वाजल्यानंतर मतदार धावत मतदान केंद्राकडे येताना दिसत होते तर काही मतदान केंद्रावर उशिरापर्यंत मतदान सुरु राहिले होते. मतदान यंत्र बिघाडाची एखादी दुसरी घटना वगळता मतदानात व्यत्यय आला नाही. (Enthusiastic voting in Gram Panchayat elections) आता उद्या मंगळवारी मतमोजणी होत असून सगळेच उमेदवार आपल्या विजयाचा दावा करीत आहेत. उद्या मात्र नक्की गुलाल कुणाचा ? याचे उत्तर मिळणार आहे, विजयी उमेदवारांना मात्र विजयाची मिरवणूक काढण्यास जिल्हा प्रशासनाने बंदी घातली आहे त्यामुळे मिरवणुकीचा जल्लोष उद्या पाहायला मिळणार नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !