मोहोळ : पाणी आणण्यासाठी नळावर गेलेल्या महिलेचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना मोहोळ तालुक्यातील पाटकूल येथे आज घडली असून रक्षाबंधनाच्या दिवशीच ही दुर्घटना घडली आहे.
विजेचा धक्का लागून मृत्यू होण्याचे प्रमाण अलीकडे वाढताना दिसत असून थोडेसे दुर्लक्ष प्राणावर बेतू शकते. परंतु कामाच्या घाई गडबडीत दुर्लक्ष होते आणि जीवाला मुकावे लागते. पाटकूल येथील एका महिलेच्या बाबतीत देखील असेच घडले आणि मृत्यू ओढवला आहे. २७ वर्षीय दिपाली अनिल तांबवे या धुणे धुण्यासाठी आणि भांडी घासण्यासाठी पाणी आणण्यासाठी घराच्या समोर असलेल्या नळावर गेल्या होत्या. या नळाला विद्युत मोटार जोडण्यात आलेली होती. दिपाली तांबवे यांचा हात चुकून मोटारीच्या वायरला लागला आणि त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !