BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

७ सप्टें, २०२२

क्रूर खून ! कटरने कापून आजीचे केले नऊ तुकडे !


शोध  न्यूज : आपल्याच आजीचे इलेक्ट्रिक कटरने कापून शरीराचे नऊ तुकडे करून नदीत फेकून दिल्याचा क्रूर, अमानुष प्रकार पुण्यासारख्या सुसंकृत शहरात उघडकीस आला असून मानवतेला हा फार मोठा हादरा बसला आहे.


आजी आपल्या नातवावर प्रचंड प्रेम करीत असते आणि तिच्या म्हतारपणातील सर्वात मोठा विरंगुळा असतो. अंगाखांद्यावर खेळवत प्रचंड लाड केलेल्या आजीचेच तुकडे तुकडे करणारा नातू जगासमोर आला आहे. विशेष म्हणजे शिक्षणाचे प्रमुख केंद्र असलेल्या पुण्यासारख्या शहरात हा अमानुष प्रकार समोर आला आणि पुणे हादरून गेले. त्याने दाखविलेल्या क्रूरतेने तमाम मानवताच हादरली आहे. आजीने रागावून घर सोडून जाण्यास सांगितले आणि दागिन्याचा ताबा देण्यास नकार दिला. याचा राग आलेल्या वीस वर्षे वयाच्या नातवाने आपल्या वडिलांची मदत घेवून आजीचा खून केला. नातवाने तर खून केलाच पण सख्ख्या मुलाने देखील त्याला मदत केली हे आणखी एक धक्कादायक आहे. 


लाडाने वाढविलेल्या नातुने वडिलाच्या मदतीने आपल्या आजीचे तुकडे तुकडे करून नदीत टाकून दिल्याचा प्रकार पुण्यातील मुंढवा परिसरात उघडकीस आला आहे. पोलिसांनी कसून चौकशी केल्यामुळे हा धक्कादायक आणि क्रूर प्रकार प्रकाशात आला आणि पोलिसांनी नातवासह त्याच्या वडिलाला अटक केली आहे.   मुंढवा परिसरात म्हसोबा नगर येथे राहणाऱ्या साहिल उर्फ गुड्डू संदीप गायकवाड या वीस वर्षाच्या नातुने आणि त्याचा वडील संदीप गायकवाड याने मानवतेला जबर धक्का देणारे हे कृत्य केले आहे. वीस वर्षीय नातुने ६२ वर्षीय आजी उषा गायकवाड यांचा अत्यंत निर्घृण पद्धतीने खून केला आणि पुरावा नष्ट करण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण पोलिसांनी त्यांचे बिंग फोडले. 


नातू साहिल याने आधी आपल्या आजीचा गळा दाबून खून केला आणि तिचा मृतदेह घेवून तो भवानी पेठेतील कासेवाडी झोपडपट्टी येथे गेला. येथे आजीचे जुने घर असल्याने तेथे कुणी रहात नव्हते याचा फायदा त्याने उठवला. त्याने एक इलेक्ट्रिक कटर आणला आणि कटरच्या सहाय्याने आजीच्या मृतदेहाचे तुकडे करायला सुरुवात केली. लाकूड कापावे एवढ्या निर्दयपणे त्याने आपल्या आजीचे ९ तुकडे केले. हे तुकडे त्याने एका पोत्यात भरले आणि खराडीच्या बाजूला जाऊन नदीत टाकून दिले. या भागात मुसळधार पाऊस सुरु होता त्यामुळे या क्रूर कृत्याकडे कुणाचेही लक्ष गेले नाही. परंतु पोलीस कर्मचारी संतोष जगताप यांना याबाबत गुप्त माहिती मिळाली आणि हा सगळा प्रकार उघडकीस आला.  

 

एखाद्या चित्रपटाच्या कथेत किंवा रहस्यमय कादंबरीत असावा असा प्रसंग प्रत्यक्षात घडला होता. अवघ्या वीस वर्षाच्या तरुणाचे हे महाभयानक कृत्य केले होते. आजीचे तुकडे करून पोत्यात भरून नदीत टाकताना मृतदेहाचा पाय नदीतून बाजूला पडला होता.  तो जवळपास २० किमी अंतरावर लोणी काळभोर पोलिसांच्या निदर्शनास आला. त्याची डीएनए चाचणी करण्यात आली तेंव्हा हा पाय उषा गायकवाड यांच्या मृतदेहाचा असल्याचे उघड झाले आणि त्यानुसार पोलिसांनी खुनाचे कलम वाढवले. (Brutal murder By cutter, Grandmother was cut into pieces) या प्रकरणी शीतल मनोज कांबळे यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. अत्यंत भयानक अशा या कृत्याने पोलीस देखील चक्रावून गेले आहेत. 


झोपेत आवळला गळा !

आजी दुपारच्या वेळी झोपलेली असताना साहिलने वडिलाच्या मदतीने तिचा गळा आवळला. त्यात तिचा मृत्यू झाला आणि नंतर हा मृतदेह कासेवाडी येथे लपविण्यात आला होता. पोलीसांची दिशाभूल करण्यासाठी आजी अचानक बेपत्ता झाली असल्याचा बनाव करण्यात आला. काहीच पुरावा मिळू नये म्हणून आजीचा मोबाईल गादीच्या खाली लपवून ठेवला. झाड कापण्याचे इलेक्ट्रिक कटर मंगळावर पेठेतून विकत आणले. आजीचा मृतदेह ओढत बाथारूनमध्ये नेला आणि तेथे आजीचे तुकडे करण्यात आले. 


तुकडे नदीत टाकले !

घरातील बाथरूममध्ये आजीचे तुकडे केल्यानंतर ते एका पोत्यात भरले आणि मोटारीतून केशवनगर येथे नेले. आजीचे काही तुकडे तेथील नदीत टाकले तर काही थेऊर येथे जाऊन नदीच्या पुलावरून वाहत्या पाण्यात टाकले. तेथून शाणपणे घरी येवून रक्ताने माखलेला कटर आणि कपडे मांजरी येथील वाहत्या नदीत टाकून दिले. काही दिवसात त्यातील एक पाय नदीच्या पात्रात पोलिसांना आढळून आला आणि पोलिसांनी तपास करीत नातू आणि त्याच्या वडिलांच्या मुसक्या आवळल्या.  केवळ संपत्तीसाठी हे भयानक हत्याकांड केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !